कर्नाटक : राज्यातील पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचे निश्चित झाले आहे. हायकमांडच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाईल. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळातील सदस्यांना सक्रीय करण्यासाठी त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. सिंधगी आणि हनगल मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार 100 दिवस पूर्ण करणार आहे. या संदर्भात मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. यामुळे प्रशासन यंत्र प्रभावी होते.
वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा घेण्याबरोबरच त्यांचा अनुभव आणि क्षमता पक्षाच्या संघटीकरणासाठी वापरली जाणार आहे. हायकमांड स्तरावर आधीच याबाबत चर्चेची एक फेरी पूर्ण झाली आहे. बोम्मई मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभुमीवर काम न करणाऱ्या 3-4 मंत्र्यांना वगळून त्यांना दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत, असे पक्षाचे मत आहे. सध्या 4 मंत्री पदे भरण्यासाठी प्रलंबित आहेत. जर चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले तर 8 नवीन मंत्र्यांना संधी दिली जाईल. संघ परिवाराचे सदस्य आणि पक्षनिष्ठांना मंत्रिमंडळात प्रितिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे समजते.