बेळगाव ता. निपाणी : तवंदी घाटातील अमर हॉटेलजवळ गुरुवारी झालेल्या दुचाकी अपघातातील गंभीर जखमी झालेल्या युवकाचा कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राजेंद्र वीरभद्रय्या हिरेमठ (वय 40, रा. दत्त गल्ली, निपाणी) यांचे शुक्रवारी निधन झाले. राजेंद्र हिरेमठ व शिवानंद हिरेमठ (रा. शिरगुप्पी) हे दोघे गुरुवारी रात्री 11 च्या दरम्यान दुचाकीवरून निपाणीकडे येताना दुचाकी घसरून अपघात झाला होता.
राजेंद्र हिरेमठ गंभीर तर शिवानंद हिरेमठ किरकोळ जखमी झाले होते. राजेंद्र हिरेमठ यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.