बेळगाव : बेळगाव-खानापूर व्हाया जांबोटी मार्गावरील अवघड अशा ब्रिटिशकालीन कुसमळीच्या ब्रिजवर दोन वाहने अडकल्याने काही काळासाठी बेळगाव-जांबोटी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. गोव्याकडे जाण्यासाठी जांबोटी ते खानापूर या पर्यायी मार्गाचा वापर काहींनी केला आहे. सोमवारी रात्री दोन्ही ट्रक ब्रिजवर अडकल्याने वाहतूक खोळंबली आहे.मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तरी दोन्ही वाहने ब्रिजवरच अडकून पडली होती.
खानापूर - जांबोटी - चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर असलेल्या कुसमळी पुल हा अवजड वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. ब्रिटिशकालीन पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक बनला आहे.