बेळगाव-रायबाग : 'सॉरी' म्हणून मृत्यूची चिठ्ठी लिहून कॉलेज विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यलपरट्टी गावात घडली. निंगान्ना (मारुती) चिदानंद नावी (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. माहिती अशी, निंगन्ना जमखंडी येथील बीएलडी कॉलेजमध्ये बीएस्सी शिकत होता. परंतु तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या गावी यलपरट्टी येथे आला होता. घराच्या बाल्कनीत झोपणारा निंगन्ना रात्री खोलीत झोपला होता.
सकाळी आई-वडिलांना जाग आल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याने मृत्युपूर्वी मृत्युपत्रही लिहून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने चिठ्ठीत लिहिले की, 'मला माफ करा, मला बीएस्सी आवडत नाही आता माझ्यावर खूप अभ्यासाचे दडपण आहे, त्यामुळे मी मरेन. सॉरी पप्पा, सॉरी मम्मी', असे लिहून ठेवले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच हारुगेरी पोलिस ठाण्याचे पीएसआय राघवेंद्र खोत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.