तर मला सीमाभागात जावं लागेलबेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ हा हल्ला केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत आता भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. सीमावादाला वेगळं रुप दिलं जात आहे. बेळगावात आज जे घडलं ते निषेधार्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. सीमाभागात जे घडतंय ते चुकीचं आहे. त्यामुळे आता सीमाभागात जे घडतंय त्याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे.
नोव्हेंबरमध्ये जत संदर्भात भूमिका मांडली, सोलापूर संदर्भात भूमिका मांडली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी भाषा केली त्यामुळे सीमाभागात स्थिती गंभीर झाली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर परिस्थिती आणखी बिघडेल. संयम काही मर्यादेपर्यंत पाळला जाईल, मात्र त्यानंतर काही घडलं तर पुढील परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही शरद पवार यांनी दिला. कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांडकून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. सीमावादाला सुरुवात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं.
तर मला सीमाभागात जावं लागेलकेंद्राचा दबावाचा प्रश्न नाही, दोन्ही राज्यात त्यांचे सरकार आहेत. आपली माणसं संयमाची भूमिका घेत आहेत. या अगोदर तिकडचे मुख्यमंत्री अशी भूमिका घेत नव्हते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे मला फोन आले होते. यावेळेस राज्य सरकार काय करतंय हे पाहणं महत्वाचे आहे. जर परिस्थिती अशीच कायम सुरु राहिली तर माझ्यासह इतर लोकांना तिथे धीर द्यायला जावं लागेल. लोकांचा उद्रेक वाढू शकतो, तो उद्रेक वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत, असंही शरद पवारांनी म्हटलं.