अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमीला दसरा साजरा करण्यात येतो. असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून पाळण्यात येते. याच दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता आणि याच दिवशी दुर्गा मातेने महिषासूराचा वध केल्याचे सांगण्यात येते. रावणाचा वध आणि महिषासूराचा अंत याच दिवशी झाल्याने वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. प्राचीन काळापासून या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी सुरू केलेल्या शुभ कार्यात यश मिळते, अशी मान्यता आहे.
प्राचीन काळात या दिवसापासूनच युद्धावर जाण्याची क्षत्रियांची परंपरा होती. या महिन्यापासून पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे या दिवसापासून युद्ध किंवा मोहिमांना सुरवात करण्यात येत होती. त्यामुळे या दिवशी शस्त्रपूजनाची पंरपरा असल्याचे सांगण्यात येते. विजयादशमीला सुरू होणाऱ्या युद्धांमध्ये विजय मिळतो, अशी मान्यता असल्याने ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे विद्याग्रहणासाठीही याच दिवशी सुरुवात करण्यात येत होती. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य सुरू करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. श्रीराने युद्धापूर्वी शमीच्या वृक्षाचे पूजन केले होते. त्यामुळे शमीच्या वृक्षाच्या पूजनाची परंपराही असल्याचे सांगण्यात येते.