बेळगाव : खानापूर तालुक्यातील कणकुंबी प्रवासी मंदिराजवळ कारच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. गुलाबी पांडुरंग गवस (वय 65, मूळ रा. पारवाड, ता. खानापूर, सध्या वास्तव्य म्हापसा-गोवा) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात चालक महादेव गवस आणि रेणू महादेव गवस यांच्यासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कणकुंबी प्रवासी मंदिराजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात वास्कोतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. खानापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.