कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवरील अतिवाड, बेकिनकेरे, हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, चलवेनहट्टी, अगसगा, बसुर्ते, बाची, बंबरगे, तुरमुरी, मण्णीकेरी, म्हाळेनट्टी आदी गावातून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बेळगाव शहरापासुन 14 किमी अंतरावर असलेल्या अगसगा गावामध्ये महाराष्र्टातुन आलेल्या कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यावेळी देशातील सर्वात मोठ्या दोन राष्र्टीय पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्या कामगारांना क्वारंटाईनमुक्त झाल्याने व घरी सोडण्यात येत असल्याने मिठाई वाटली व आनंद साजरा केला. माञ आता हीच मिठाई वापट त्यांची डोकेदुःखी ठरणार की नाही...? हे आज 31 मे सायंकाळच्या आरोग्य विभागाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये स्पष्ट होणार आहे.
गावात क्वारंटाईन असलेल्या त्या कामगारांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत Coronavirus तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. माञ रिपोर्ट येण्याच्या अगोदरच क्वारंटाईन दिवस संपल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. क्वारंटाईनमुक्त झालेल्या त्या कामगारांपैकी दोघा जणांना कोरोना व्हायरस झाल्याची शक्यता आहे. सोडलेल्या काही कामगारांना आरोग्य विभागाने पुन्हा ताब्यात घेतले. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची गावात चर्चा आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची दाट शक्यता असल्यानेच आरोग्य विभागाने त्यांना रुग्णालयात नेल्याची शक्यता आहे. ही बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली आहे. आज सायंकाळी 5 वाजताच्या आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये याबाबत अधिकृत माहिती मिळताच याची पुष्टी होईल. माञ ही शक्यता सत्यता बदलणार की एक पसरलेली कोरोनाची अफवा हे आरोग्य विभागाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये कळणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तसेच हंदिगनूर गावापासुनजवळ जवळ असलेल्या म्हाळेनट्टी गाव व गोकाक येथेही असाच प्रकार घडल्याने आमदार सतिश जारकीहोळी यांनी संताप तीव्र संताप व्यक्त केला आहे.