मान्सून 7 जून रोजी कर्नाटक व महाराष्र्टामध्ये दाखल होईल असा अंदाज असताना आज बेळगावात दुपारीच पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून 1 जून रोजी प्रथम केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना आजच भारताच्या समुद्रकिनारी दाखल झाला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी भारतात पोहोचला होता.
मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच 31 मे रोजीच भारतात दाखल झाला आहे. अखेर भारतीयांच्या चार महिन्यांच्या सणाला सुरुवात झाली आहे. बेळगावमध्ये दुपारचे दोन वाजलेले असताना सायंकाळचे 7 वाजल्यासारखे वाटत आहे. दरम्यान याआधी भारतीय हवामान विभागाने मान्सून 1 जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर असा फरक असेल, असं म्हटलं होतं.
निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून
भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी मान्सून अतिशय गरजेचा आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर आधारित आहे. देशात निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून आहे. तांदूळ, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांसाठी पाऊस अतिशय आवश्यक असतो. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो.