बेळगाव : शेतात पाणी देण्यासाठी जात असताना पाय घसरून कालव्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी निदर्शनास आली आहे. भरत जनार्दन साळुंखे (वय 48, रा. शिरगाववाडी, ता. चिक्कोडी) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे.
मिळालेली माहिती अशी, साळुंखे गुरूवारी रोजी रात्री 9 वाजता पिकाला पाणी देण्यासाठी जाताना शिरगांववाडी येथील बिराप्पा गावडे यांच्या शेताजवळ कालव्याकडून जाताना पाय घसरुन कालव्यात पडले. पोलिस उपनिरीक्षक (गुन्हे) एस्. डी. असंगी यांनी कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. याबद्दल मृत जनार्दन साळुंखे यांचा मुलगा प्रशांत यांने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.