AstraZeneca's Covid vaccine may cause blood clotting : Should you be worried?Covishield Vaccine : कोरोना लसीची आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती, मात्र आता ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने कोरोना लसीबाबत स्वतः च कबुली दिली आहे. जागतिक लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने कबूल केले आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या कोविड-19 लसीमुळे रक्त गोठणे आणि प्लेटलेट कमी होणे यासारखे दुर्मिळ आजार होण्याची शक्यता आहे. भारतातील लोकांना या लसीचे सुमारे 175 कोटी डोस देण्यात आले आहेत.
AstraZeneca admits its vaccine causes clottingअशा परिस्थितीत भारतात ही लस घेणाऱ्या लोकांनी काळजी करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत तज्ज्ञांच्या अहवालात दिलासादायक माहिती समोर आली आहे. द डेली टेलिग्राफच्या मते, ॲस्ट्राझेनेकाने कोर्टात थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) साइड इफेक्ट म्हणून कबूल केले आहे. प्रत्यक्षात, लसीकरणानंतर गंभीर नुकसान आणि मृत्यू झाल्याचा आरोप करत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने प्रथमच न्यायालयात हे मान्य केले आहे. जेव्हा युरोपमध्ये TTS चे पहिले प्रकरण नोंदवले गेले तेव्हा काही देशांनी AstraZeneca लस वापरणे बंद केले.
2022 मध्ये लॅन्सेट ग्लोबल हेल्थने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, AstraZeneca मुळे प्रथम डोस घेतलेल्या लोकांमध्ये प्रति दशलक्ष 8.1 TTS प्रकरणे होतात. तर ज्यांनी दुसरा डोस घेतला त्यांच्यामध्ये हा आकडा 2.3 प्रति दशलक्ष इतका खाली आला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, टीटीएसच्या घटना वेगवेगळ्या देशात आहेत. नॉर्डिक देशांतून सर्वाधिक प्रकरणे (17.6 प्रति दशलक्ष डोस) आणि सर्वात कमी आशियाई देशांतून (0.2 प्रति दशलक्ष डोस) आहेत. यासंबधीचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
भारतातील लोकांना काळजी करण्याची गरज का नाही? : भारतात, कोरोनाची लस घेतल्यानंतर लोकांमध्ये होणाऱ्या दुष्परिणामांबाबत एक सरकारी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने टीटीएसशी संबंधित किमान 37 प्रकरणांची चौकशी केली. यापैकी 18 प्रकरणे 2021 पूर्वी लस घेतलेल्या लोकांशी संबंधित आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की TTS ची नोंद युरोपियन देशांमध्ये साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या काळात झाली होती परंतु भारतात ती फारच दुर्मिळ होती. लसीकरण मोहिमेवरील चर्चेचा भाग असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, टीटीएस हा लसीचा अत्यंत दुर्मिळ दुष्परिणाम आहे. हे अजूनही भारतीय आणि दक्षिण आशियाई लोकांमध्ये युरोपीय लोकांपेक्षा दुर्मिळ आहे. लसीने लोकांचे प्राण वाचवले आहेत याचे पुरेसे पुरावे आहेत. या प्रकरणात त्याचे फायदे टीटीएस प्रकरणांपेक्षा बरेच मोठे आहेत.
लस घेतल्यानंतर पुढील काही आठवडे महत्त्वाचे : अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, टीटीएसशी संबंधित प्रकरणे बहुतेक पहिल्या डोसच्या काही आठवड्यांत नोंदवली जातात. बहुतेक भारतीयांना आधीच तीन लस घेतल्या आहेत आणि त्याला बराच वेळ झाला आहे. डॉ. गगनदीप कांग, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे ग्लोबल हेल्थ डायरेक्टर आणि कोविड-19 लसींसाठी WHO च्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य, म्हणाले की लसीकरणानंतर लगेचच TTS चा धोका आहे याची लोकांना खात्री देणे सर्वात महत्त्वाचे आहे. भारतातील प्रत्येकाचे लसीकरण फार पूर्वीपासून झाले आहे.