Watch Video : WPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्समने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. पण या सामन्यात रनआऊटच्या अपीलवर अंपायर्सने दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर आता बदललेला नियम प्रकाशझोतात आला आहे. वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून दुसऱ्याच सामन्यात काही वादग्रस्त घटना घडल्या. 15 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्समने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.
WPL : Run-out controversies overshadow Delhi Capitals' thrilling last-ball win over Mumbai Indiansत्या सामन्यात शेवटच्या काही षटकात तिसऱ्या पंचांनी मुंबई इंडियन्सने केलेल्या धावबादच्या अपीलवर काही वादग्रस्त निर्णय दिले होते. फलंदाज क्रिजलाईनच्या जवळ असताना स्टम्पवरील लाईट्स लागल्यानंतरही धावबाद न दिल्याने सर्वच चकीत झाले होते. त्या सामन्यानंतर थर्ड अंपायर गायत्री वेनुगोपालन यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे नक्की नियम काय आहेत, यावरही चर्चा झाली. माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगमध्ये धावबाद आणि यष्टीचीतबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. फलंदाजाला तेव्हाचं बाद ठरवले जाईल, ज्यावेळी LED बेल्स हे पूर्णपणे स्टंप्सपासून वेगळे होतील. यापूर्वी बेल्स थोडे हलून लाईट्स लागल्यानंतरही लगेचच फलंदाजाला धावबाद दिले जात होते. पण हा नियम आता बदलण्यात आला आहे.
WPL clarifies run out rules after Mumbai Indians-Delhi Capitals controversyLED bails need to be fully dislodged to judge that a wicket is broken in regards to run outs and stumping decisionsरिपोर्टमध्ये सांगितल्या प्रमाणे झिंग बेल्सवरील लाईट्स कधीकधी नुसता धक्का लागल्यानेही आधीच (लाल होतात) लागतात. त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता आणि चुकीचे निर्णयही दिले होते. त्यामुळे नियमात सध्या बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे सामन्यात अधिक अचुकता येईल. दरम्यान, या बदललेल्या नियामाबाबत सर्व पंचांना आधीच माहिती देण्यात आली होती. मात्र, संघांना मात्र आधी याबाबत सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे संवादाचा अभाव झाल्याने गोंधळ वाढला.Please click here to Watch this Video or Photo on X (twitter)