मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिलीये. यावेळी अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर नेहमी अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता तसंच मराठी माणसाचा सन्मान आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.'
राज्याची सर्वांगिण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असंही अजित पवार म्हाणालेत.स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.