पश्चिम बंगाल : दाट धुक्यामुळी भीषण अपघात झाला. मंगळवारी रात्री या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जलपैगुडी जिल्ह्यात धुक्यामुळे हा अपघात झाला. एका लग्न वऱ्हाडाच्या बसचा जलपैगुडी जिल्ह्यात जलढाका ब्रिजजवळ अपघात झालाय. येथील धुपगुरी जिल्ह्यात हा अपघात झाला. याठिकाणी एक खडी भरलेला डंपर रस्त्यावरुन जात होता. एक कार या डंपरच्या उलट्या बाजूला जात होती. मात्र, ही कार जवळ आल्यावर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा डंपर खडीसह कारवर उलटला.
कारमधील सर्व लोक या खडीखाली गाडले गेले. याशिवाय, या भागात दाट धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या सर्व अपघातांमध्ये मिळून जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरूष, सहा महिला, चार लहान मुलांचा समावेश आहे. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पाहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.